नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत संशोधनाला आणि निर्मितीला प्राधान्य देणारा या वर्षीचा अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रातल्या एकूण निधी पैकी 70 टक्के निधी देशांतर्गत निर्मितीसाठी राखीव ठेवला आहे, असंही ते म्हणाले. परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्याची प्रक्रिया फार क्लिश्ट आणि वेळकाढू आहे. ही शस्त्रास्त्र भारतात पोहचे पर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्या संरक्षण सज्जतेसाठी ती निरुपयोगी ठरतात. या समस्येवर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हा एकमेव उपाय आहे, असंही मोदी म्हणाले.संरक्षण क्षेत्रात केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांमध्ये या क्षेत्रातल्या कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, हा या वेबिनारचा उद्देश होता. संरक्षण मंत्रालयातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठीही यी वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं.