नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, जळगाव इथं वार्ताहरांशी बोलतांना, आपली भूमिका स्पष्ट केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्याबाबत आपण सुरुवातीच्या काळात जे वाचलं होतं, त्यावरून समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत अशी आपल्याला माहिती होती. मात्र इतिहासातली काही तथ्यं मला सांगण्यात आली आहेत. आपण ती तथ्यं तपासून घेऊ असं ते म्हणाले.