नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या खारकिव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

खारकीव्ह आणि युक्रेनमधल्या इतर शहरांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर पडता यावं यासाठी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला रशिया आणि युक्रेनच्या राजदुतांशी चर्चा करणार आहेत. रशिया आणि युक्रेनमधले भारताचे राजदूतही स्थानिक सरकारसोबत यासाठी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.