मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधीत भ्रष्टाचार- गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायलयानं रद्द केला.

काही ठोस बाबींचा तपास सीबीआयमार्फत होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं.या प्रकरणी दोषी कोण आहेत, सत्य काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे, असंही निरिक्षण न्यायालयानं नोदंवलं. सीबीआयनं निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी सुचना न्यायालयानं केली. मात्र विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.