मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव श्रीमती मेघना तळेकर, विधान परिषद  सभापतींचे  सचिव महेंद्र काज, अवर सचिव सोमनाथ सानप, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.