नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौदलात अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे. या उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी करण्यात येणार असून, त्यातल्या २५ टक्के उमेदवारांना निर्धारित निकषांवर सैन्यात भरती होण्याची संधी आहे.

उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना ११ ते १२ लाख रुपयांचं सेवानिधी पॅकेज देण्यात येईल. सेवेच्या सुरुवातीला ३० ते ४० हजार रुपयांचं वेतन तसंच सेवा संपताना कौशल्य प्रमाणपत्र तसंच पुढच्या आयुष्यासाठी बँक कर्ज उपलब्ध असेल. अग्निवीरांना पुरस्कार पदकं आणि वीमा मिळवण्याची अर्हता मिळेल.