नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली.

महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, मात्र सध्या वातावरण अत्यंत कलुषीत झालं असून, जातीय वादाकडे वाटचाल सुरु आहे, असं ते म्हणाले. ते काल पुण्यात कोथरुड इथं प्रचारसभेत बोलत होते.