नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.

यात्रेदरम्यान कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुनिश्चित करावा, ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनीच यात्रेत सहभागी व्हावं असं त्यांनी दोन्ही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसने या पत्रसंबंधी आपली नाराजी व्यक्त केली आहे.