नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाचं नशीब आणि देशाची प्रतिमा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंंदे यांनी कोल्हापुरात काढले. मैत्रीण फाऊंडेशनतर्फे आयोजित महिला मेळावा तसंच रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे  बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं भगवा झेंडा फडकवला त्या काळात नौसेना उभारली, किल्ले बांधले छत्रपती शिवरायांच्या विचारानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत, असं ते म्हणाले.