नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांजवळ भारताच्या सागरी हद्दीत संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मच्छिमार बोटींना भारतीय तटरक्षक दलानं ताब्यात घेतलं आहे. या बोटींना पुढल्या चौकशीसाठी कवरत्ती इथं आणण्यात आलं.

मात्र, खराब हवामान आणि कवरत्ती इथल्या मर्यादित सुविधांमुळे या बोटींना न्यू मंगळूर इथं नेण्यात आलं. या बोटीवरचे सर्व 15 कर्मचारी सुरक्षित असून या बोटी आणि त्यावरचे कर्मचारी यांची ओळख अद्याप पटलेली नाही.