नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आज ते संबोधित करत होते. आय.आय.टी संस्थांमधे केवळ गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश मिळतो असं सांगून ते म्हणाले की जनतेच्या जीवनमानात बदल घडवण्याचं काम आय.आय.टी संस्थांनी केलं आहे.