नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे.

भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल, हरदीपसिंग पुरी यांसह अनेक खासदारांचा समावेश आहे. येत्या ९ तारखेला कर्तारपूर मार्गिकेचं उद्धाटन होणार आहे.

या मार्गिकेमुळे पंजाबातलं डेराबाबा नानक गुरुद्वार आणि पाकिस्तानातला कर्तारपूर इथलं दरबार साहिब गुरुद्वार जोडलं जाणार आहे.