छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान

मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहेअसे गौरवोद्‌गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सिक्कीम येथील सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकआदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना माय होम इं‍डिया’ या संस्थेचा वन’ इंडिया पुरस्कारराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयेशालश्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेश्रीमती लेपचा कठोर परिश्रमातून समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत. अनाथ मुलांसाठीसुद्धा त्यांचे मोठे कार्य असून हे राष्ट्रीय  कार्य अभिनंदनीय असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटीलसारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडियाचे संस्थापक सुनिल देवधरराहूल राठीकेंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता आदी उपस्थित होते.