नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरच्या जनतेवर पाकिस्ताननं लादलेलं छुपं युद्ध अद्याप संपुष्टात आलं नसल्याचं जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे.

ते गंदरबाल आणि हंदवाडा इथं पोलिस दरबार कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा आणि एकात्मता कायम राखण्यासाठी जम्मू-कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांचा सातत्यानं लढा सुरू आहे, असं ते म्हणाले.

या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना शांततामय वातावरणात राहाता यावं यासाठी विनाशकारी वृत्तीचं आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.