मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शेतकऱ्यांना तात्काळ  कर्जमाफी, अवकाळी पाऊस आणि महापुराने फटका बसलेल्या मदत, आशा आणि आंगणवाडी सेविकांच्या सवलतीत  आणि मानधनात वाढ, स्थानिकांना नोकऱ्यात प्राधान्य देण्यासाठी कायदा, शिक्षणाच्या दर्जात सुधारणा हे मुद्दे या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात आहेत.

नोकदार महिलांसाठी शहरी तसंच निमशहरी भागात होस्टेलची उभारणी, बेरोजगारांसाठी फेलोशिप अशाही योजना या किमान समान कार्यक्रमात आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे,  राष्ट्रवादीचे जयंत पाटील, नबाब मलिक आणि   काँग्रेसचे  बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं.