नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैदराबादच्या बलात्कार पीठीतेच्या कुटुंबाना जलद गतीनं न्याय मिळायला पाहिजे असं, केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.

संसदेमधे बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण राज्य सरकारच्या अधिका-यांनी आणि पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतली असून, राज्य सरकारनं तपास वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारला कुठलीही मदत करायला केंद्र सरकार तयार असल्याचं ते म्हणाले. हे निघृण अपराध असून, संपूर्ण देश हादरला आहे, असा शब्दात त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.