मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रदेशाध्यक्षासह पक्ष स्तरावरील सर्व नियुक्त्या पूर्ण करेल असं पाटील म्हणाले. मुंबई महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे, २०१७ मधे झालेल्या निवडणुकीत भाजपानं २२७ पैकी ८२ जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती, शिवसेनेनं ८६ जागा जिंकल्या होत्या.