नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून विविध संस्थांनी पुकारलेल्या बंदमुळे आसाममधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसामच्या वरच्या भागात दुकानं बंद ठेवण्यात आली असून, रहदारीही बंद आहे.

राजधानी गोहाटीमधे या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. जनतेच्या हिताला बाधा येईल, असं सरकार काही करणार नाही, असं भाजपानं म्हटलं आहे.