नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदेत मंजूर झालेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक विभाजनकारी मानसिकता तयार करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला.

मुंबईत पक्ष कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते काल बोलत होते. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणं हा एकांगी निर्णय असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा या विधेयकाला स्पष्ट विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं.