मुंबई : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

हे बदल पुढीलप्रमाणे आहेत. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री. छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.