नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विचारवंत आणि धर्मागुरुंनी सरकारला मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे.

समाजातल्या विचारवतांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांचे विचार सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा नीट वाचून समजून घ्या, आणि कोणत्याही अफवांकडे लक्ष देवू नका, असं आवाहन राममनोहर लोहिया वैद्यकीय संस्थाचे संचालक डॉ. ए. के त्रिपाठी यांनी केलं आहे.