नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं असून, ऋषभ पंत हा एकमेव यष्टीरक्षक संघात आहे.

२४ जानेवारीपासून टी-ट्वेंट मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारत मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार असून, पहिला सामना उद्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.