सांगली  : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर येथे राजाराम बापूंच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांच्यासह कारखान्याचे संचालक तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरीक उपस्थित होते.