नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात नऊ गडी बाद २८६ धावा केल्या.

स्टीवन स्मिथनं १३१ धावा केल्या. भारतानं ४७ षटकं तीन चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा करत विजय मिळवला. रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं एकोणतीसावं शतक झळकावत ११९  धावा केल्या, रोहित शर्माला सामनावीर, तर विराट कोहलीला मालिका वीर म्हणून गौरवण्यात आलं.