नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या  सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे.

कोलंबो इथं संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी ही कबुली दिली. मृत पावलेले बहुतेकजण एलटीटीईशी संबंधित होते, असं संयुक्त राष्ट्रांचे समन्वयक हन्ना सिंगर यांनी बातमीदारांना सांगितलं. या सर्वांच्या मृत्यूचा दाखला देण्यासंदर्भात पावलं उचलल्याचं सिंगर यांनी सांगितलं.