नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद या विमानतळांवरच्या प्रवाशांना खास कारागिरांनी निर्माण केलेले ३० हजारांहून अधिक ध्वज देऊन एअर इंडियानं वेगळ्या प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा केला.

एअर इंडियानं श्रीनगरच्या लाल चौकात “हॅप्पी रिपब्लीक डे-अ फिलिंग कॉल्ड इंडिया” अशा संदेशाचा मोठा फलक लावला होता. एअर इंडियानं काश्मिर खो-यात पहिल्यांदाच असा फलक लावला होता.