मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधामुळे श्रीलंकेत अडकलेल्या सुमारे ७०० भारतीय नागरिकांनी भारतीय नौदलाच्या युद्धनौकावरून मायदेशी परतले आहेत. श्रीलंकेतल्या भारतीय उच्चायुक्तांनी आज ही माहिती दिली.

श्रीलंकेतील कोलंबो पोर्ट पासून निघालेलं आयएनएस जलाश्व हे जहाज काल तामिळनाडूतील तूतीकोरिन या बंदरावर पोहचलं. वंदे भारत मोहिमेअंतर्गत भारतीय नौदल जहाजांनी ही कामगिरी पार पाडली.