जळगाव जिल्हा आढावा बैठक
नाशिक : राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू माणून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहेशेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना होत असलेला त्रास लक्षात घेता ऊर्जा विभागाने कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलीत्यावेळी ते बोलत होतेया बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलकृषिमंत्री दादाजी भुसेआमदार चंदुलाल पटेलचिमणराव पाटीलकिशोर पाटीलसुरेश भोळेअनिल पाटीलमंगेश चव्हाणश्रीमती लताताई सोनवणे,  मुख्य सचिव अजोय मेहतामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीकृषी सचिव एकनाथ डवलेजलसंपदा सचिव आयएसचहलऊर्जा सचिव असिमकुमार गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. सगणेविभागीय आयुक्त राजाराम मानेजिल्हाधिकारी डॉअविनाश ढाकणेमुख्य कार्यकारी अधिकारी डॉबीएनपाटीलआदींसह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणालेशेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहेशेतकऱ्यांसाठी राज्य शासन अनेक योजना प्राधान्याने राबवित आहेशेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे शासनही शेतकरी हितास प्राधान्य देत आहेशेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे याकरिता राज्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईलयामध्ये जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पपद्मालय सिंचन प्रकल्पबलुन बंधारे शेळगाव बॅरेजवरखेड लोंढे प्रकल्पाची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलअंजनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 
जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईलअसे सांगून चाळीसगाव येथील कत्तलखान्याची चौकशी करुन अहवाल सादर करावाचाळीसगावमालेगाव रस्त्यांची दुरुस्ती एक महिन्याच्या आत करण्यात यावीचाळीसगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्यास मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करावीकॅश सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित विभागांना यावेळी दिल्यात.
अमळनेर येथील रुग्णालयाचा दर्जोन्नती करणास मान्यता देण्याबरोबर जळगाव बायपास जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यास प्राधान्य देण्यात येईलधानोरा येथील सबस्टेशन उभारण्याची कार्यवाही तातडीने करावीतसेच महानगरपालिका व नगरपालिकांना एलईडी लाईट पुरविण्यास केंद्र शासनाने एकच एजन्सी नेमली असल्याने येणाऱ्या अडचणी लक्षात घेता  लाईटचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन एजन्सीशी करण्यात आलेल्या कराराचा आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा सचिवांना दिले.       
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचीअंजनी प्रकल्पाची उंची वाढविण्याचीतापी खोऱ्यातील गुजरातला जाणारे पाणी  अडविण्याचीआमदार किशोर पाटील यांनी वन्यजीवांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचीक्रीडा संकुले पूर्ण करण्याचीमंगेश चव्हाण यांनी  कत्तलखाना बंद करणेचाळीगाव मालेगाव रस्ता दुरुस्तीकृषी विभागातील रिक्त पदे भरणेअनिल पाटील यांनी नदीजोड प्रकल्प राबविणेअमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणेदगडी दरवाजा दुरुस्तीलताताई सोनवणे यांनी धानोरा येथील सबस्टेशन उभारणीतापी नदीवर दुसरा पुल बांधणेजात पडताळणी कार्यालय धुळे येथे सुरु करणेसुरेश भोळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून घरे उभारणेजळगाव शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर करणेजळगाव शहरातील विशेष निधीतून होणाऱ्या कामांची स्थगिती उठविणेतर चंदूलाल पटेल यांनी जळगाव शहरास जोडणाऱ्या बांभोरी पुलास पर्यायी पुल तयार करण्याची मागणी बैठकीत केली.
यावर मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने संबंधित विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन त्या सोडविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.