नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली इथं झालेलं एनसीसीचं प्रजासत्ताक दिन शिबीर तसंच स्पर्धांमध्ये राज्यातील एकशे सोळा विद्यार्थी आणि दहा अधिकाऱ्यांनी बजावलेल्या सुरेख कामगिरीच्या सन्मानार्थ राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.