नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

‘किसान रेल’ ची व्याप्ती संपूर्ण देशभर करावी या हेतूनं नियोजन सुरु असल्याचं रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी आज बातमीदारांना सांगितलं.