नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. जम्मू-श्रीनगर मार्गावर गेल्याच महिन्यात ही घटना घडली होती.

हे अतिरेकी सांबा या भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये कसे आले, याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्याचे नोटिफिकेशन काल केंद्रीय गृहमंत्रालयाने काढले.