नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसेच नवे बदल स्वीकारावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्य सहकारी बँकांच्या संघटनेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी कामकाजात बदल करावे, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.