नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी गटार सफाई आणि सेप्टीक टँक सफाई करणा-या ११० सफाई कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत दिली.

२०१५नंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. सर्वाधिक २१ मुत्यू उत्तरप्रदेशात झाले असून त्या खालोखाल १७ मृत्यू झालेल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.