नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची शबनम सहाय पहिली आली आहे. तिला 372 पैकी 308 गुण प्राप्त झाले आहेत.