नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनादेशाचा अवमान करून शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केली अशी टीका,भाजपा नेते विनोद तावडे यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ इथं पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडीला कसं पराभूत करता येईल याची रणनिती आज राज्यस्तरिय अधिवेशनात करण्यात आली, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्य भाजपाची दोन दिवसीय राज्यकार्यकारिणीची बैठक नेरुळ इथं होत असून, यात राज्यातले पक्षाचे खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपा राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाणार नाही. भाजपाची राज्यात एकहाती सत्ता आणू हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.