नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.

राज्य शासनाचा सहकार विभाग आणि राज्य सहकारी पतसंस्था संघटनेनं आज अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा घेतला, या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.