नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीबाबत इतर कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यंत त्यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल असे त्यांनी सांगितले अंजनी गावातल्या पाटील यांच्य़ा स्मृतीस्थळाच्या बांधकामासाठी आठ कोटी ७ लाख रुपयांचा निधी लवकर दिला जाईल मात्र स्थानिक नेत्यांनी त्या निधीचा योग्य वापर करावा अशी अपेक्षा पवार यांनी  व्यक्त केली.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामीण विकास मंत्री हसन मुस्रिफ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.