नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ”मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

युवकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना , उत्साह आणि तंत्रज्ञानाची जाण याचा समाजासाठी उपयोग व्हावा या हेतूनं ही योजना भाजपा सरकारनं सुरु केली होती , या योजनेच्या माध्यमातून हजारो मुलांनी प्रशासकीय कामाचा अनुभव घेतला असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे. ३१ मार्च २०२० पासून हा उपक्रम बंद करण्याच्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.