नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या भागात झालेल्या हिंसाचारातल्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. याप्रकरणी १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त भागात पुरेशा सुरक्षादलांची नियुक्ती करण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं कळवलं आहे.

याठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ७३ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून दिल्ली पोलिसांच्या ४० तुकड्या त्यांच्या सोबतीला आहेत. याठिकाणची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी सांगितलं.