नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

सार्क गटाच्या स्थापना दिनानिमित्त सार्कच्या सचिवालयाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी या उपाययोजनांमुळे सार्क वरचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

भारताच्या सार्कमधल्या सहभागाला दहशतवादाचा वृत्यांमुळे तसंच धमक्यांमुळे वारंवार आव्हानं दिल जात असल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावाला.