नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या दंगलग्रस्त ईशान्य भागातल्या शाळा 7 मार्च पर्यंत बंद राहतील. अशांत वातावरणामुळे शाळांच्या वार्षिक परिक्षाही 7 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं शिक्षण मंडळाच्या संचालकांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. या काळात शिक्षक आणि मुख्याध्यापक मात्र शाळेत हजर राहतील.