नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.

या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नसल्यानं, या स्पर्धेसाठीच्या नियमानुसार साखळी फेरीत अटात अव्वल स्थान मिळवलेल्या भारताला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. याआधी भारतानं कधीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नव्हती.

आता स्पर्धेच्या ८ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ आज दुपारी दुसऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिया यांच्यातल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातल्या विजेत्याशी पडेल.