नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसंर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्‍या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले.