नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे.

मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय महिला संघानं आतापर्यंतचे सर्व सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सलामीच्या सामन्यातच भारतानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. दरम्यान, इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे  ‘अ’ गटात भारतीय संघ पहिल्या स्थानावर, तर ‘ब’ गटात इंग्लंड संघ दुस-या स्थानावर असल्यानं, भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला.