नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांत तेरा नवे विषाणू बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत या विषाणू बाधित रुग्णांची एकुण संख्या ७३ झाली अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, आणि सरकारतर्फे योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत.

आतापर्यंत ९४८ प्रवाश्यांना मायदेशात आणले आहे. यात ९०० भारतीय आणि ४८ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.