नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही भारतीय देशात परतणार आहेत.

त्यांच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विलगीकरणासाठीची ही व्यवस्था जोधपूर, झांसी, गोरखपूर, कोलकाता, जैसलमेर, चेन्नई आणि देवळाली इथे करण्यात येणार आहे. या ठिकाणी लोकांना विलगीकरणासाठी ठेवता येईल असेही ते म्हणाले.