नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या लढाईमधे सर्वांची जबाबदारी असून या संसर्गाच्या विरोधात प्रत्येकानं आपली भूमिका पाळायची आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

जम्मू-कश्मीर राज्यातल्या उपायांची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत नायब राज्यपाल राजीव राय भटनागर, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे वित्तीय आयुक्त अटल डुल्लू उपस्थित होते.

सद्यपरिस्थितीत वैद्यकीय अधिकारी अमूल्य योगदान देत आहेत. जम्मू-कश्मीरच्या जनतेनंही उद्याच्या जनता कर्फ्यूला सहकार्य करावं, त्यामुंळे संसर्गावर नियंत्रण मिळवायला मदत होईल, असंही त्यांनी सांगितलं.