नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बरा होऊ शकतो, कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला.
पुणे, मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका, कोणत्याही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत तसंच बाधित लोकांशी माणुसकीने, आपुलकीने वागा, माणुसकी सोडून वागू नका असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं.
राज्यातल्या रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर आहे. फिलिपिन्सवरून आलेल्या नागरिकाचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील तीनच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.