नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या आजाराची लागण झालेले ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर या आजारानं १७ जण दगावले आहेत.

दरम्यान देशभरात २७ हजारांहून अधिक संशयित कोरोनाबाधित रुग्णांपैकी २६ हजार ७९८ जणांच्या नमून्यांची चाचणी झाली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.