नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील गुजरी इथं वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री राळेगाव तसंच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेड वर वीज कोसळली. त्यामुळे त्यात मुक्कामी असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील हे सदस्य असून यात चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

या कुटुंबाच्या ५०  गायी असून त्यांच्या चराईसाठी ते शेतात मुक्कामी होते. वाशीम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

जालना शहर आणि जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्री अधूनमधून पाऊस पडत होता.

गडचिरोली जिल्ह्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता.